चिपळूण ; अतिवृष्टीसह महापुरातील नुकसानग्रस्तांना ३४ कोटींचे वाटप , शासकीय मदत न मिळाल्यांनी संपर्क साधा- तहसिलदार जयराज सुर्यवंशी

0
125
बातम्या शेअर करा


चिपळूण – २२ व २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुराने हाहा:कार माजवित चिपळूण शहरासह तालुक्यातील घर, गोठे, दुकाने, शेतीसह अन्य खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यातील ९० टक्के नुकसानग्रस्तांना आतापर्यंत महसूल विभागाकडूप सुमारे ३४ कोटींची नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र ज्या नुकसानग्रस्तांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांनी केले आहे.


चिपळूण तालुक्यातील महापूर व अतिवृष्टीचा फटका बसलेल्या आपदग्रस्तांना दि. ११ ऑगस्ट २०२१, दि. १ ऑक्टोबर २०२१ व दि. १७ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्याची कार्यवाही सुरु आहे. महसूल विभागाने आजपर्यंत ३४ कोटी ६ लाख ८३ हजार ३३२ रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आाली आहे. मात्र नुकसानग्रस्त यादीतील बऱ्याच आपग्रस्तांचे खाते क्रमांक व शासन निर्णयान्वये आवश्यक असलेले इतर कागदपत्र प्राप्त न झाल्यामुळे दहा टक्के बाधित घरे, गोठे, दुकाने, शेती यांचे अनुदान वाटप करता आलेले नाही. हे अनुदान शंभर टक्के वितरीत करण्यासाठी तालुकास्तरावर तलाठ्यांमार्फत व वैयक्तिक याद्वारे संपर्क साध्यण्यात आलेला आहे. तरी पंचनामे झालेले आपग्रस्तांपैकी ज्यांना अजूनपर्यंत अनुदान प्राप्त झालेले नाही, अशा आपदग्रस्तांनी दि. २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आपले खाते क्रमांक व शासन निर्णयान्वये कागदपत्रासहीत कार्यालयाशी अथवा वार्ड निहाय या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. अन्यथा शिल्लक अनुदान शासन जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम शासन जमा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अनुदान वाटप करता येणार नाही, याची आपदग्रस्तांनी नोंद घ्यावी. नुकसान भरपाई वाटपाबाबत कोणतीही अडचण असल्यास तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहनही तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here