मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना संदर्भातील उपचार पद्धतींवर भाष्य केलं. ‘राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या आणि पावसाला येतोय तर याकाळात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.