गुहागर – स्वतःच्या आईला तिच्या मृत्यूच्या दहा वर्ष आगोदरच शासकीय कागदपत्रावर मृत घोषित करून मालमत्ता बळकावल्या बद्दल गुहागर तालुक्यातील सुरळ येथील त्या प्रकरणांची पोलखोल प्रगती टाइम्सने केल्यावर यांची दखल घेत गुहागर तहसीलदार यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाअधिकारी यांनी दिले आहे.
सुरळ येथील प्रतिष्ठित व्यापारी इब्राहिम अब्बास बोट यांनी सन २००३ साली आपल्या वाडिलांच्या मृत्यूनंतर केलेल्या वारस तपासात खोटी माहिती देऊन शासनाची निव्वळ फसवणूक केल्या प्रकरणी त्याच गावचे मुश्ताक बोट यांनी याबाबत सर्व कागदपत्रे सादर करत या ठिकाणी शासनाची फसवणूक झाली असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले व त्याबाबत सर्व संबंधित खात्यास पुरावे सादर करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गुहागरचे तहसिलदार यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पत्र नुकतेच तक्रारदार मुश्ताक बोट यांना प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान जिल्हाधिका-यांनी दिले चौकशी आदेशानुसार गुहागरचे तहसिलदार संबंधितावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.