कोकण कृषी विद्यापीठाने विकसीत केले मनुष्यचलित भात लावणी यंत्र

0
262
बातम्या शेअर करा

दापोली- कोकणातील चढ उताराच्या भात शेतीकरिता अंत्यत उपयुक्त अशाप्रकारचे मनुष्यचलित भात लावणी यंत्र कोकण कृषी विद्यापीठाने नव्याने विकसीत केल्याने भात लावणीचे हे यंत्र कोकणातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. भात हे कोकणातील मुख्य पिक आहे.

कोकणात साधारपणे 4.13 दश लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र भात लागवडी खाली आहे.कोकणामध्ये अजूनही पारंपारिक पध्दतीनेच भातशेती केली जाते जे खुप कष्टाचे काम आहे.तसेच भात शेतीच्या कामासाठी शेतमजूरांची आवश्यकता लक्षात घेता मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या कोकणातील भातशेती उत्पादनावर परिणाम होतो याचा विचार करून दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यावर मात करण्यासाठी एक उपाय योजना म्हणून मनुष्यचलित भात लावणी यंत्र तयार केले आहे.
सध्या बाजारात विविध प्रकारची परदेशी बनावटीची भातलावणी यंत्रे उपलब्ध असली तरी कोकणातील चढउताराच्या छोटया खाचरांच्या शेतीसाठी ही उपलब्ध असलेली यंत्रे फारशी उपयोगी पडलेली नाहीत त्याचप्रमाणे यंत्रांच्या न परवडणाऱ्या किंमती आणि तसेच यासाठी लागणारे चटई रोप वाटीका यामुळे ही यंत्रे फारशी उपयोगी झाली नाहीत शिवाय यंत्रे वजनाने जड असल्यामुळे चढउताराच्या डोंगराळ भागातून शेतीपर्यंत नेआण करणे अवघड व वेळखावू आहे.या सर्व समस्यांचा पर्याय म्हणून कोकणातील चढउतारावरील शेतीसाठी योग्य हलके तसेच पारंपारिक पध्दतीची भात रोपे वापरून सुयोग्य असे यंत्र डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृशी विद्यापीठाने विद्यापीठातर्गंत अखिलभारतीय समन्वित संशोधन प्रकल्प श्रमविज्ञान आणि शेतीतील सुरक्षितता या योजनेतर्गंत भात लावणी करिता उपयुक्त असे यंत्र विकसीत केले आहे.या यंत्रामुळे ताशी सुमारे २५० चौरस मीटर क्षेत्र लागवड करता येते अशाप्रकारचा दावा कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे.
कोकण कृशी विद्यापीठाने विकसीत केलेल्या या यंत्राला दोन ट्रे जोडलेले असून या ट्रे मध्ये भात रोपे ठेवली जातात या ट्रे चा आकार ५५० रूंदी ४५० लांबी असलेल्या सेंटी मीटरचा आहे.या यंत्राला चालविण्यासाठी हॅण्डलला चेन व स्प्राॅकेट बसविण्यात आला आहे. हॅण्डलकडून यंत्राच्या मुख्य शाफ्टला शक्ती मिळते भातरोपे पकडणारे आणि भातरोपे रोवणारे असे दोन मुख्य शाफ्टर बसवलेले आहेत चिमटयामध्ये भातरोपे पकडली जातात आणि तेथून ती खाली असलेल्या पट्टीमुळे जमिनीत रोवली जातात.
हे यंत्र चालविण्यासाठी दोन शेतमजूरांची आवश्यकता असते एक शिक्षण शेतमजूर यंत्र चालविण्यासाठी तर दुसरा भातरोपे ट्रे मध्ये ठेवण्यासाठी.या यंत्राचे वैशिष्टय म्हणजे हे यंत्र वजनाने हलके असल्याने एक मजूर खांदयावर मारून डोंगर दरीतून कोठेही घेवून जावू शकतो पारंपारिक पध्दतीपेक्षा ७० टक्के खर्च कमी होतो. असा विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांचा दावा असून या यंत्राव्दारे भात लावण्याची कार्यक्षमता ही पारंपारिक पध्दतीपेक्षा चारपट अधिक आहे.
मनुष्यचलित भात लावणी यंत्र हे वजनाने हलके असून अगदी सहजपणे एका शेतातून दुसया शेतात नेता येते या यंत्राने पारंपारिक पध्दतीने तयार केलेली भातरोपे लावता येतात.या यंत्राने ताशी २५० ते ३००चौ.मी.( २.५. ते ३ गुंठे ) क्षेत्रावर लावणी करता येते.यंत्र वापरण्याचा सराव केल्यास हे यंत्र शेतकरी भगीनींही सहज वापरू शकतात.कमी होत चाललेल्या भात शेतीच्या शाश्वत यांत्रिकिकरणासाठी हे यंत्र नक्कीच उपयुक्त ठरेल -डाॅ.विजय आवारे,प्रमुख अन्वेशक आणि प्राध्यापक कँस, कृषि यंत्रे व शक्ती विभाग, कृषि अभि.आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली..


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here