गुहागरचा राजकीय किनारा राष्टवादीच्या नेत्यांना सोसेना ! सहदेव बेटकरांसह कार्यकर्त्याना सोडले वाऱ्यावर …..

0
433
बातम्या शेअर करा

गुहागर -(विशेष प्रतिनिधी ) – राज्यात सगळीकडे निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यातच कोकणातील महत्त्वपूर्ण अशी लढत होत आहे ती गुहागरमध्ये याठिकाणी शिवसेनेचे भास्कर जाधव व राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांच्यात लढत होते मात्र एकीकडे भास्कर जाधव यांच्या शिवसेनेचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. तर एकीकडे मात्र सहदेव बेटकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बडे नेते नसल्याने राष्ट्रवादी गोंधळात दिसत आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत घरवापसी केली त्यामुळे ऐनवेळी या गुहागर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून कोण निवडणूक लढवणार ? याची चाचपणी करता करता अखेर राष्ट्रवादीने शिवसेनेतून आयात केलेले उमेदवार सहदेव बेटकर यांना उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत प्रचाराचा कालावधी कमी असल्याने सहदेव बेटकर यांनी तालुक्यातील शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्र करत प्रचाराची धुरा सांभाळत आत्तापर्यंत प्रचार सुरू आहे. मात्र असे असले तरी अद्यापही राष्ट्रवादीच्या राज्यस्तरावरील एकाही नेत्याने गुहागर मध्ये येऊन अद्यापही सहदेव बेटकर यांच्या प्रचाराला मदत न केल्याची खंत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवतात त्यामुळे खरोखरच राष्ट्रवादीला येथील जागा राखायची आहे. की नाही किंवा सहदेव बेटकर यांना एकटे पाडायचे आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
गेल्या महिन्यात गुहागरमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने स्टारप्रचारक अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सभा झाली. या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी पक्षांतर करणाऱ्यावर जरासुद्धा टीका केली नाहीच शिवाय मी महिन्यातून दोनवेळा गुहागरमध्ये येईन तेव्हाच काय ते बोलेन असे स्पष्ट करुन वेळ मारुन नेली होती. ज्या सहदेव बेटकरांना शिवसेनेतून राष्टूवादीमध्ये येण्याची गुरुकिल्ली दिली ते तटकरे खेड, दापोलीसारख्या शेजारच्या मतदारसंघात येऊन धन्यता मानतात मात्र जिथे आपण उमेदवार दिला तेथील चुरशीच्या लढतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
सहदेव बेटकर यांना या मतदारसंघातून कुणबी समाजाचा वाढता पाठिंबा असला तरी त्यांच्या प्रचाराची पद्धत आणि प्रचार करण्याचे नियोजन योग्य पद्धतीनं नसल्याने अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारातून अलिप्त राहणे पसंद केले आहे. तसेच त्यांचा कुठेही जाहीर प्रचार किंवा छोट्या बैठका, सभा झालेल्या नाहीत. त्यामुळे आगामी काही दिवसात जर राष्ट्रवादीच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी या मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली नाही तर या मतदारसंघात राष्ट्रवादीला विजयाची गुढी उभारताना खूपच अवघड होईल असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here