बाबासाहेबांचे अलौकिक कार्य कायम स्वरूपी स्मरणात राहिल – शितल पाटील

0
178
बातम्या शेअर करा

आबलोली- 26 नोव्हेंबर 1949 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान लिहून हे संविधान भारत देशाला अर्पण केले व मानव जातीला बंधनातून मुक्त केले बाबासाहेबांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत. .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अलौकिक कार्य कायम स्वरूपी स्मरणात राहिल असे स्पष्ट मत बार्डी संस्था रत्नागिरीच्या समता दूत शितल पाटील यांनी व्यक्त केले.

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रांपचायत आबलोली येथे सरपंच तउकरं पागडे यांच्यासह मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलीत करून व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रतिमेचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक बी. बी. सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून शितल पाटील पुढे म्हणाल्या की , समता , स्वातंत्र्य , बंधूत्व या तत्वानेच बाबासाहेबांनी प्रत्येक मानवाला संविधानाव्दारे व्यक्ती स्वातंत्र्य दिले हे बाबासाहेबांचे न फिटणारे उपकार आहेत असे सांगून शितल पाटील यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून प्रतिज्ञा ग्रहन करण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंच तुकाराम पागडे , माजी सरपंच महेंद्र कदम , ग्रामसेवक बी. बी. सुर्यवंशी , पोलीस पाटील महेश भाटकर , ग्रामपंचायत सदस्या सौ. मिनल कदम , सदस्य प्रमेय आर्यमाने , आशिष भोसले , कर्मचारी योगेश भोसले , अमोल शिर्के आदि उपस्थित होते


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here