नाणार रिफायनरीचा ठाकरे सरकारने पुनर्विचार कराव – भाजप नेते बाळ माने

0
187
बातम्या शेअर करा

रत्नागिरी- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्र सरकारने रत्नागिरीत नाणार रिफायनरी व्हावी, ही भूमिका घेतली होती. तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प कोकणचे भविष्य बदलून टाकणारा, उजळवून टाकणारा होता. मात्र दुर्दैवाने भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे या रिफायनरी प्रकल्पाचा ठाकरे सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी भाजप नेते माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यानी केली आहे.
रत्नागिरीसह कोकणातील तरुणाईच्या हाताना रोजगार देणारा असा हा मोठा प्रकल्प आहे. मात्र काही लोकांच्या विरोधाला पाठिंबा देत, त्यांच्या भावनेच्या आहारी जात शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे हा चांगला प्रकल्प रखडला आहे. विरोधामुळे हा प्रकल्प होऊ शकलेला नाही.  शिवसेनेचे विद्यमान खासदार, आमदार यांनी या प्रकल्पाला विरोध केला. वास्तविक राज्यासाठी, देशासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा होता. नवे रोजगार या ठिकाणी आले असते. मोठी गुंतवणूक येथे आली असती.परंतु भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे जिल्ह्यासाठी असलेली एक मोठी संधी दूर गेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ही रिफायनरी ठाकरे सरकारने जिल्ह्यात आणली पाहिजे. नाहीतर येथील तरुण पिढी ठाकरे सरकारला माफ करणार नाही. म्हणून मला आजही वाटते की नाणार रिफायनरी व्हायला हवी. त्यातून कोकणचा विकास होणार आहे. रत्नागिरीचा जिडीपी वाढणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे. या सर्व भूमिका विचारात घ्यायला हव्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा असे माने म्हणाले.
विरोधक आणि समर्थक
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये नाणार आणि अन्य १६ गावांच्या हजारो एकर जमिनीवर रिफायनरी प्रकल्प सेना- भाजप युती सरकारच्या काळात मंजूर झाला होता. मात्र काहींचा विरोध तर काहींचे समर्थन या वादात हा प्रकल्प शिवसेनेने रद्द करून घेतला. त्यानंतरही कोकणातील लोकांना येथेच रोजगार मिळावा आणि कोकणच्या विकासाचा रथ पुढे हाकण्याची गरज अनेकांना वाटते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी समर्थकांची फौज मैदानात उतरली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here