पाणीटंचाई सोडवण्यासाठी योग्य नियोजन करा-आमदार योगेश कदम

0
158
बातम्या शेअर करा

खेड – खेड तालुक्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज झालेल्या पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीदरम्यान आमदार योगेश कदम चांगलेच आक्रमक झाले. सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरत येत्या आठ दिवसांत पाणीटंचाईचा विषय प्राधान्यक्रमाने हाती घेवून नियोजन करण्याची तंबी दिली.

कृषीअधिकारांची हजेरी घेत हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय
केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.
शहरातील वैश्य भवन येथे पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीदरम्यान तालुक्यातील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून नेमके कोणते प्रयत्न झाले? असा सवाल आमदार कदम उपस्थित केल्यानंतर कुठल्याच अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर मिळाले नाही. टंचाई आराखडात वर्षानुवर्ष असणाऱ्या गाव – वाड्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी साखळी बंधारे बांधण्याच्या सूचना करत याचा तातडीने आराखडा तयार करण्याचे आदेश देखील संबंधितांना दिले.

तालुक्यातील ५ गावे व ११ वाड्या टंचाईमुक्त झाल्याची माहिती देण्यात आली. ही बाब प्रशंसनीय असली तरी उर्वरित गाव – वाड्याही टँकरमुक्त करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या. अनेक योजनांवर शासनाचा निधी खर्च झालेला असून संमतीपत्रही देण्यात आले आहे. लोकल बोर्डाच्या विहिरी व अन्य शासकीय इमारती, पाण्याची टाकी, शाळागृहे या जागांचे सातबारे शासनाच्या नावाने करण्याच्या सूचना आमदार कदम यांनी प्रांतअधिकारी व तहसीलदार यांना दिल्या असल्याचे स्पष्ट केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here