चिपळूण- सर्वसामान्यांना आर्थिक बळ देऊन आपल्या पायावर उभे करणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५० व्या गणेशखिंड शाखेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी या परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक करीत या शाखेच्या शुभारंभाबद्द्ल शुभेच्छा दिल्या.
चिपळूण नागरी सहकारी पटसंस्थेची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी ठरली आहे. या संस्थेने वर्षभरापूर्वी रौप्य महोत्सव दिमाखात साजरा करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे आदी मान्यवरांनी या पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. एकंदरीत या पतसंस्थेने ‘आपली माणसं आपली संस्था’ या ब्रीदवाक्याप्रमाणे सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. यामुळे या संस्थेची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी ठरली आहे. इतकेच नव्हे तर या पतसंस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नुसत्या शाखा सुरू केल्या नाहीत. तर या शाखांमधील अर्थव्यवहार यशस्वी करून दाखविले आहेत. यामुळेच चिपळूण नागरी सर्वसामान्यांसाठी आधारवड करत आहे. या संस्थेची ३० सप्टेंबर २०२० अखेर सांपत्तिक स्थिती भाग भांडवल ५६ कोटी, ठेवी ७६३, सभासद कर्ज ५९७ कोटी, पैकी सोनेतारण कर्ज २२५ कोटी ६ लाख, गुंतवणूक २५६ कोटी, नफा सप्टेंबर अखेर २० कोटी रुपये असा आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या ५० व्या शाखेचे गणेशखिंड येथे नुकतेच उद्घाटन झाले. यावी संचालक सत्यवान म्हामुणकर, राजेश वाजे प्रतिष्ठित गृहस्थ अनिल चिले, सनिल वाजे, गणपत तटकरे, सुनील टेरवकर, संदीप चिले, अजय वाजे, नंदकुमार चव्हाण, अबूबकर खोत, दिलीप देसाई, संजय मिरगल, गंगाराम महाडिक, तुकाराम बामणे, मधुकर सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरीचे संस्थापक व चेअरमन सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली