चिपळूण, – केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकर्यांच्या दृष्टीने हिताचे आहे. या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात आणि शेतकर्यांमध्ये अमुलाग्र बदलणार होणार आहेत. असा दावा भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केला. या विधेयकाला विरोध करणार्या युवा संघटनेत किती शेतकरी आहेत. असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसला हाणला.
डॉ. नातू पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला राज्यातील एका युवक संघटनेकडून विरोध होत आहे. तो पूर्णपणे चुकीचा आणि शेतकर्यांची दिशाभूल करणारा आहे. या विधेयकामुळे शेतकरी खर्या अर्थाने आत्मनिर्भर होणार आहे. शेतकर्यांना आपला शेतमाल कोणालाही विकता येणार आहे. बाजार समित्यांचे अधिकार कमी होतील पण अस्तित्व नष्ट होणार नाही. शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या माथी कामगारांची गरज कालही होती उद्याही असणार आहे. हा कायदा कोकणच्या हिताचा आहे. केंद्रात कोकणचे प्रतिनिधीत्व करणार्यांनी तो व्यवस्थितपणे मांडायला हवा होता पण कालपर्यंत सत्तेत बसलेले आता विरोधात आहेत. त्यामुळे ते कदाचित ते या कायद्याचा अभ्यास करत असतील असा टोला त्यांनी खासदार विनायक राऊत यांना हाणला.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कामगार विधेयक कायद्याचे डॉ. नातू यांनी समर्थन केले. ते म्हणले, काळानूसार डिजिटीलायझेशन आणि यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उद्योगासाठी लागणारी कामगारांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे हे विधेयक काळानूसार बदलण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ बस कर जिल्हा सरचिटणीस रामदास राणे शहराध्यक्ष अशिष खातू नगरसेवक विजय चित्ते प्रणय वाडकर ओमकार बापट आदी उपस्थित होते