रत्नागिरी जिल्ह्याचा कारभार पाहताहेत प्रतिपालकमंत्री – विनय नातू

0
312
बातम्या शेअर करा

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. सरकारकडून योग्य नियोजन झाले नाही त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. पण जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे वेळच नाही. त्यामुळे प्रतिपालकमंत्री जिल्ह्याचा कारभार पाहत आहेत. त्यांना कुणी आणि कोणते अधिकार दिले हे तरी स्पष्ट होऊ दे. असा टोला त्यांनी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना लगावला. ते चिपळूण मधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात दोन मास्क आणि सॉनिटायरझरचे वाटप केले जाणार आहे. अशी घोषणा उदय सामंत यांनी केली. त्यावर डॉ. नातू म्हणाले, हा तर ठेकेदाराच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रत्येक जिल्ह्यात जावून तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करायचे. त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले. कोरोनाची साथ पसरल्यानंतर जे काम आरोग्य विभागातील यंत्रणेकडून सुरू होते तेच काम माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेतून होत आहे. म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीमध्ये मुख्यमंत्र्यांची औषध वाटली जात आहे. कामथे उपजिल्हा रूग्णालयाला जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला खरा पण त्यांना तो अधिकार आहे का ? जिल्ह्यात चार वरिष्ठ अधिकारी डॉक्टर आहेत. या अधिकार्‍यांचे टास्क फोर्स तयार करून कोरोनाबाबत तातडीचे निर्णय होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. नातू यांनी व्यक्त केले.
यावेळी पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ बस कर जिल्हा सरचिटणीस रामदास राणे शहराध्यक्ष अशिष खातू नगरसेवक विजय चित्ते प्रणय वाडकर ओमकार बापट आदी उपस्थित होते


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here