गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातून आज आंतरजिल्हा बस वाहतूक सुरू झाली आज चिपळूण मार्गे कराड ,कोल्हापुर ,मिरज सांगली याठिकाणी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित गाड्या प्रवासाच्या प्रतिसाद नुसार सोडण्यात येतील. सातारा,पुणे, सोलापूर या मार्गावर ही आजपासून बसेस सोडण्याचा प्रयन्त केला जाणार आहे.
जे पहिलं तिकीट होते त्याच दरात सोशल डिस्टस्टींगची अमलबजावणी करून प्रवासी सेवा देण्यात येणार आहे. तसेच या प्रवासाला ही पासची आवश्यकता नाही. गेली पाच महिने लालपरीला ब्रेक लागला होता मात्र गणेशोत्सवच्या मुहूर्तावर आता जिल्हा बाहेर एसटीची सेवा सुरू करणयात आली आहे.