चिपळुण ; शिमगोत्सवासाठी २७४ फेऱ्या १५ मार्चपर्यंत सुरु राहणार

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकणच्या शिमगोत्सवाला गावागावतून प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्याठिकाणी असणारे बहुसंख्यने गावच्या दिशेने दाखल होवू लागले आहेत. यासाठी चिपळूण आगारातून जादा एसटी फेऱ्याचे नियोजन केले आहे. या फेऱ्यांना फेब्रुवारी अखेरीस प्रारंभ झाला असून १५ मार्चपर्यंत तब्बल २७४ फेऱ्या सोडण्यात येणार आहे.

कोकणात प्रमुख सणापैकी एक असणाऱ्या शिमगोत्सवाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. होळी, पालखी सोहळा, जत्रा अशा माध्यमातून संस्कृतीचे घडवणाऱ्या शिमगोत्सवाची विविध दर्शन ओढ असते. ठिकठिकाणी प्रत्येक कोकणवासियाला तालुक्यात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यामुळे कामानिमित्त बाहेर असणारे बहुतांशी भाविक गावच्यादिशेने दाखल झाले आहेत. यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या व शिमगोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता चिपळूण आगाराने प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही विशेष नियोजन केले आहे. गावच्यादिशेने भाविक येऊ लागल्याने यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी देखील वाढली आहे. चाकरमान्याच्या मागणीनुसार बसस्थानकातून सुटणाऱ्या तसेच पुन्हा तेथून बसस्थानकात येणाऱ्या फेऱ्याचे आगार प्रशासनाने नियोजन केले आहे. या फेऱ्यांना २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. १५ मार्चपर्यंत या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. आहेत. त्यानुसार एकूण २७४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शिमगोत्सवात गावी येणाऱ्या जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुलभ झाला आहे. मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे. त्यासाठी योग्य नियोजन करून स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here