शृंगारतळी नदीपात्रात मलयुक्त पाणी .. कोणाचा आशीर्वाद..?

0
476
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील नदी प्रवाह मध्ये मलयुक्त पाण्याचा खड्डा खणून सार्वजनिक जागेत हे पाणी सोडल्याने सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे पाणी सोडण्यासाठी कोणता राजकीय नेता किंवा कोणता शासकीय अधिकारी त्याला पाठिंबा देतो की काय अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चिपळूण गुहागर या मुख्य मार्गावरील नदी प्रवाह नदी प्रवाहाच्या शेजारील काही ग्रामस्थांनी आपले सांडपाणी सोडण्यासाठी नदी प्रवाहाच्या मध्यभागी मोठा खड्डा खोदून त्यात सांडपाणी सोडले आहे. परिणामी या नदीचे पाणी दूषित होत असल्याची तक्रार या नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या वझरवाडी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत पाटपन्हाळे, तसेच गुहागरचे तहसीलदार व गुहागरचे गटविकास अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे.

शृंगारतळीतून वाहणारी की मुख्य नदी असून या नदीपात्रातच अशा प्रकारे मलयुक्त सांडपाणी सोडण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे पाणी सोडल्याने त्या नदीतील पाणी दूषित होत असल्याची तक्रार याआधी सुद्धा येथील ग्रामस्थांनी केली होती. कारण याच नदीचे कडेला असणाऱ्या विहिरी आणि बोरवेल या पाण्यामुळे दूषित होत आहेत. आणि या दूषित पाण्यामुळे या परिसरातील काही नागरिकांना कावीळ , टीबी यासारखे आजार झाल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. भविष्यात येथील नागरिकांना जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण.? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा केला जात आहे. येत्या दोन दिवसात संबंधित प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन तो खड्डा जर तात्काळ बुजवला नाही. तर 26 जानेवारी रोजी वझरवाडी येथील ग्रामस्थ हे उपोषणाला बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नामवंत ग्रामपंचायत पाटपन्हाळे याबाबत आपली भूमिका काय घेणार याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here