खेड- रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडीचे पाणी बाजारपेठेत भरण्यास सुरूवात झाली आहे.
.खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी या दोन नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खेड शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.