पुणे- पुण्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने २० ते २५ पर्यटकही वाहून गेल्याचे वृत्त येत आहे.
मावळातील तळेगाव दाभाडेनजीक कुंडमळ्याजवळील पूल कोसळून २० ते २५ पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाले. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या कुंडमळ्यावर रविवार असल्यामुळे आज पर्यटकांची तोबा गर्दी होती. हा पूल जीर्ण झाला होता. मागील काही दिवसांपूर्वी धुव्वाधार पावसामुळे पूल खचलाही होता. आज दुपारच्या सुमारास पूल वाहून गेल्याने पर्यंटक वाहून गेले. आतापर्यंत ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत काही नदीत काही पर्यटक बुडाले होते. त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके म्हणाले, आज दुपारच्या समयी आम्हाला दुर्घटनेसंबंधी माहिती कळाली. स्थानिक यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानुसार आत्तापर्यंत सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सर्व यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.