खेड ; जगबुडी पुलावरील त्या अपघाताला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – वैभव खेडेकर

0
109
बातम्या शेअर करा

खेड – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी पुलावरील अपघातामध्ये मृत झालेल्या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करताना राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून यामध्ये दोषी अधिकारी यांच्यावर तत्काळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केली.


वैभव खेडेकर यांनी अपघात घडल्यानंतर काही वेळातच घटनेच्या ठिकाणी मदतकार्यात सहभाग घेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी आपली आक्रमकता आजही कायम असून महामार्गाचे रखडलेल्या कामामुळे आपण अनेकवेळा आंदोलनात्मक भूमिका घेतली. प्रसंगी प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल करून दीड महिने जेलमध्ये ठेवले. त्याचवेळी योग्य नियोजन करून दर्जेदार रस्त्याची कामे झाली असती तर आता असे अपघात घडले नसते. मात्र राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने कायम रस्ते सुरक्षितेकडे दुर्लक्ष करून प्रवाशी जनतेच्या जीविताशी खेळ सुरू ठेवून आजपर्यंत त्याच ठिकाणी किती अपघात घडले? यामध्ये वित्तहानी तर झाली. त्यापेक्षा किती लोकांचे बळी गेले. याचा विचार राज्यकर्ते करणार आहेत का? असा संताप श्री. खेडेकर यांनी व्यक्त करून आपण पुन्हा याच ठिकाणी आंदोलन करून पुढील अपघात घडू नये यासाठीच पाठपुरावा करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महामार्गाचे चौपदरीकरण करताना कशेडी खवटी ते लोटे परशुरामपर्यंत अनेक ठिकाणी अपघात घडतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भरणे जगबुडी पूल, भोस्ते घाट येथे अपघात घडलाच नाही, असा एकही दिवस नाही. या अपघाताला जबाबदार कोण? महामार्गाचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळेच येथे वारंवार अपघात घडत असल्याचे श्री. खेडेकर यांनी सांगताना महामार्ग चौपदरीकरणात संबंधित अभियंता यांनी केलेल्या अनेक चुकांचे उदाहरणे श्री. खेडेकर यांनी माध्यम प्रतिनिधीच्या समोर मांडताना जे दोषी अभियंता आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे. अन्यथा मनसे उग्र आंदोलन छेडले, असा इशारा श्री. खेडेकर यांनी दिला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here