खेड – मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर खेड भरणा
नाका येथे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
खेड भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन ही कार सुमारे १०० फूट खोल नदीत कोसळून हा भीषण अपघात झाला. मुंबईहून देवरुख येथे अंतविधीसाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातातील मृतांमध्ये मेधा पराडकर, सौरभ पराडकर , मिताली मोरे, निहार मोरे , श्रेयस सावंत , यांचा समावेश आहे. दोन कुटुंबातील हे लोक मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. मुंबई मिरारोड-भाईंदर येथे राहणारे हे रहिवासी देवरूख जात असताना हा अपघात झाला.