गुहागर ; आठ लाख कोटी कर्ज असताना लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणणार कुठून.? मनसेचा सवाल..

0
105
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज असताना लाडक्या बहिणीसाठी पैसे आणणार कुठून ? कोणती ही योजना जाहीर करणे आणि ती अमलात आणणं याच्यात फरक आहे. अशी घणाघाती टिका मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर
यांनी गुहागर येथे केली.

आगामी विधानसभा निवडणूक लढणार असे राज ठाकरेंनी जाहीर करताच अविनाश अभ्यंकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील तालुका निहाय दौरे सुरू केले. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज ते गुहागर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आत्ताच्या महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली तसेच मुंबई गोवा महामार्ग एवढी वर्ष का रखडला याचा जाब लोकांनी विचारावा असंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे कोकणातील असलेल्या नामवंत कंपन्यांमध्ये जर स्थानिकांना रोजगार दिला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करून ते प्रश्न सोडवत आहे. असे सांगत आता येथील जनतेने मनसेच्या पाठीमागे एकदा मोठ्या ताकतीने उभे राहावे असे आव्हान केले. मग बघा मनसे कसे अनेक बदल घडवते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे संभावित उमेदवार वैभव खेडेकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गुहागरच्या दौऱ्यावर आलेले अविनाश अभ्यंकर हे आले कधी आणि गेले कधी हे फक्त ठराविक पत्रकारांनाच समजले. कारण अभ्यंकरांचा दौरा हा किती पत्रकारांना आणि किती कार्यकर्त्यांना माहिती होता याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कारण शृंगारतळी येथे आलेले अविनाश अभ्यंकर ठराविक पत्रकारांना सोडलं तर इतर पत्रकारांना माहिती नव्हते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here