दिलीप खेडकर सोबत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची चौकशी व्हावी – माजी आमदार संजय कदम

0
259
बातम्या शेअर करा

खेड – सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिलीप खेडकर यांची कोकणातील कारकीर्द देखील वादात सापडले आहे खेडकरांचे हेडक्वार्टर नेहमीच खेड असायचे,मा.पर्यावरण मंत्राच्या खेड गावात खेडकरांच्या बैठका चालायच्या त्यांच्या इच्छेनुसार कंपन्यांना क्लोजरच्या नोटिसा दिल्या जायच्या मा.पर्यावरण मंत्र्यांच्या खेड गावात सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिलीप खेडकर यांचे हेडकॉटर असायचे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी आज केला आहे तर मा.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर देखील एका वकिलाने केलेल्या आरोपानुसार दिलीप खेडकर यांच्या सोबतच रामदास कदम यांची देखील एसीबीने चौकशी करण्याची मागणी संजय कदम यांनी केली आहे.


2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची देखील दिलीप खेडकर यांच्यासोबत एसीबीने चौकशी करावी दिलीप खेडकर हे कोल्हापूर विभागात प्रादेशिक अधिकारी म्हणून काम करत असताना तसेच राज्यात इतरत्र काम करत असताना त्यांनी किती कंपन्यांना क्लोजर चे नोटीस दिली व त्याच्यापुढे काय झाले याची देखील चौकशी एसीबीने करावी क्लोजर चे नोटीस दिल्यानंतर पुढे काय झालं तडजोडी झाल्या की कारवाई झाली याची माहिती घ्यावी, त्या कालावधीमध्ये केवळ कंपन्याच नाही तर कात कारखाने आणि क्रेशर ना सुद्धा खेडकर यांनी नोटिसा देऊन मोठ्या प्रमाणावर माया जमा केली व जमा करून दिली असल्याचा आरोप देखील केला आहे

कोल्हापूर विभागात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी असताना दिलीप खेडकर यांची कारकीर्द देखील वादग्रस्त होती त्यांच्या बैठका या पर्यावरण मंत्र्यांचे गाव असलेल्या खेडमध्ये व्हायच्या हे सगळं खोटं असेल तर त्या माजी मंत्र्यांनी तसेच तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी त्यांच्या गावदेवी कोटेश्वरी देवीची शपथ घेऊन सांगावे रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेला आर्थिक फंड त्या कालावधीत किती आला याची देखील एसीबीने चौकशी करावी आपण या संदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांकडे प्रत्यक्ष भेटून देखील तक्रार करणार आहोत.वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर चे वडील दिलीप खेडकर सध्या चर्चेत आले आहेत प्रसिद्ध वकील तानाजी गंभीरे यांनी दिलीप खेडकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची एसीबीने चौकशी करावी अशी लेखी मागणी राज्य शासनाकडे केली आहे,त्याचबरोबर वकील गंभीरे यांनी कोकणातील दोन मंत्र्यांची नावे घेऊन त्यांच्या बदलीसाठी कोट्यावधी रुपये घेतल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे.तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनासारखे बदली करण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे यामुळे रामदास कदम यांची देखील एसीबीने चौकशी करावी असे मागणी मी करत आहे


बातम्या शेअर करा