गुहागर – गुहागर तालुक्यामधील नावाजलेल्या रत्नागिरी गॅस आणि पावर कंपनी मधील म्हणजेच पूर्वीच्या एन्रॉन कंपनी मधील कामगारांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले होते. त्या कामगारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना उद्योग मंत्री यांनी सूचना करून कंपनीच्या अधिकारी यांना तातडीने रत्नागिरी येथे बोलवून या पिढीत कामगारांविषयी माहिती घेतली. कंपनीच्या अधिकारी यांनी या कामगारांना नोव्हेंबर अखेरपर्यंत त्यांनी कामावर आता दिलेल्या रोस्टर प्रमाणे रुजू व्हावे व डिसेंबर अखेरीस पूर्ववत कामावर समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले.

कोकणच्या विकासाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला RGPPL हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनी उद्योग मंत्री यांना आपण पुढाकार घेऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू व्हावा यासाठी विनंती केली. उद्योग मंत्री महोदय यांनी हा प्रकल्प सुरू होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वस्त केले.
हा प्रकल्प सुरू होत असताना गुहागर मधील स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी देखील मा.उद्योग मंत्री महोदय यांनी आश्वासन दिले.
ह्या सर्व घडामोडी मध्ये सिंधूरत्न योजेनेचे संचालक किरण सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
या भेटीसाठी मा. उद्योग मंत्री महोदय यांचे जवळचे सहकारी संदेश कलगुटकर, युवासेना जिल्हा संघटक मुन्ना देसाई, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे आदी पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.