गुहागर – गुहागर तालुक्यातील जामसुत ग्रामपंचायत सरपंचपदी शैलेश साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जामसूत गावची निवडणूक ज्या वेळेला पार पडली होती त्यावेळेला अडीच वर्ष सरपंच पद असा ठराव ग्रामस्थांनी केला होता याच ठरावानुसार या आदी या गावचे सरपंच महेश जामसुदकर होते. यांनी आपल्या अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या गावात सरपंच पदासाठी निवडणूक लागली यावेळी सर्वांच्या मताने शैलेश साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच महेश जामसुदकर, उपसरपंच सृष्टी रेवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश साळवी, स्नेहा देवळेकर, प्रज्ञा कुंभार, सुचिता गमरे. तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी साळवी, पोलीस पाटील वैभव रेवाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र कदम, तसेच अमित कुंभार, शांताराम पालशेतकर,प्रकाश कुंभार, दिनेश कुंभार, महेश गावडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सरपंच पदाच्या कालावधीत आपण सर्वांना घेऊन गावचा विकास करणार असल्याचं शैलेश साळवी यांनी या वेळेस बोलताना सांगितलं.