बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात आजवर कोरोनाने ४२ बळी घेतले आहेत. दिवसेंदिवस जसा कोरना रुग्णांच आकडा वाढतोय तशी बळींची संख्या देखील वाढत चालली आहे. आजवर जिल्ह्यात सर्वात जास्त बळी दापोलीतील असून हि संख्या १० इतकी आहे. यामागोमाग चिपळूण ८, रत्नागिरी ८, संगमेश्वर ६, खेड ४, गुहागर २, राजापूर २, लांजा १, मंडणगड १ अशी बळींची संख्या आहे.

सध्या जिल्ह्यात सध्या 105 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 24 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 33 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3, गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here