राजापुर – राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव येथे होणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीच्या मातीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी रत्नागिरीतून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला कशेळी येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये १७ पोलिस जखमी झाले आहेत.
बारसू येथे बंदोबस्तासाठी जाणारे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने हा अपघात झाला. जे पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना पावस आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आधिक तपास पोलीस करत आहेत.