बातम्या शेअर करा

रत्नागिरीकोकणात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पत्रकार शशिकांत वारीचे यांच्या दुचाकी ला झालेला अपघात हा अपघात बसून घातपात असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी या भीषण अपघातात जखमी झालेले शशिकांत वारीचे यांचा कोल्हापुरी येथील सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघात प्रकरणी राजापूर पोलिसांनी पळालेल्या जीप चालकाला रात्री उशिरा राजापूर हातीवले येथून अटक केली आहे. या अपघातात प्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित चालक जीपचे मालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावरती घातपाताचा गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार शशिकांत वारीशे यांचा घातपात घडवून आणल्याचा संशय व्यक्त झाल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे.सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या अपघातनंतर राजापूर येथे तातडीने भेट देत पोलिसांना पुढील तपासाच्या आदेश दिले होते.

पत्रकार शशिकांत बारीश हे मूळचे राजापूर कशेळी गावाचे सुपुत्र होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी शशिकांत वारीशे यांच्या बहिणीचे पती यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले शशिकांत वारीशी यांना कोल्हापूर येथे करण्यात आलं होतं. त्यांची जबाबदारी घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची राजधानी पोलिसांचे पथक कोल्हापुर येथे रात्री गावाला झाला होता. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

पत्रकार शशिकांत शंकर वारीशे वय 45 रा. कशेळी राजपूर कोदवली येथील पेट्रोल पंपात दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना हा भीषण अपघात झाला आहे. पंपाबाहेर पडत  असताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या महेंद्रा धार गाडी (क्रमांक एमएच 08 एएक्स 6100) या गाडीच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार वारीशे हे खाली पडले तर त्यांची दुचाकी महिंद्रा धार गाडीबरोबर फरफटत सुमारे 200 ते 250 फुट पुढे गेले या भीषण  अपघातात वारीशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे. येथील स्थानिकांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करता हलवल होत पण प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथे हलवण्यात आल आहे. या भीषण अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर येथे येऊन घटनास्थळाची पाहणी करून या सगळ्या अपघाताची माहिती घेतली होती.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी घटनास्थळी धाव घेतली या भीषण अपघाताचा पंचनामा केला होता. याप्रकरणी आता नवे वळण मिळाल असून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त झाल्याने  राजापूर पोलीस पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 308अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या सगळया प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here