मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात ४ जणांचा मृत्यू

0
569
बातम्या शेअर करा

पोलादपूर – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण ४ व्यक्तींचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याजवळ कशेडी घाटामध्ये काल रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात एकूण ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. पोलादपूर खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना रिक्षेचा अपघात झाला. खेड येथे परीक्षेसाठी जात असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचा या अपघातात दुदैवी अंत झाला आहे. या अपघातात तीन मुली आणि एक रिक्षाचालक ठार झाला आहे. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळत आहे, हालीमा अब्दुल सलाम पोपेरे, (23 वर्षे, नांदवी), आसिया सिद्दीक (20 वर्षे, गोरेगाव), नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे, सवाद) अमन उमर बहुर (46 वर्षे, गोरेगाव) यांचा मृत्यू झाला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here