गुहागर – गुहागर मधील मुंढर गावातील पश्चिम आग्रे वाडीतील ग्रामस्थ आणि कृषी विभागाने मिळून श्रमदानातून बंधारा बांधला. यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असले तरीही पाण्याचा निचरा लवकर होत असल्यामुळे अनेक ग्रामीण भागात साधारण फेब्रुवारी पर्यंत पाण्याचे कमतरता जाणवू लागते,परिणामी येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी नियंत्रणात राहावी यासाठी कृषी विभागाच्या मार्गद्शनाखाली गावो गावी वनराई बंधारे बांधले जातात. मुंढर मध्ये देखील जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहभागातून श्रमदानाने बंधारा बांधला. यावेळी नदिमधील पाणी अडवण्यासाठी माती,दगड आणि सिमेंटच्या गोणींचा वापर करत पाणी अडवण्यात आले.यावेळी मुंढर गावचे सरपंच सुशील उर्फ बबलू आग्रे, माजी सरपंच विजय रामाने,प्रदीप आग्रे,सखाराम आग्रे,पांडुरंग सांगळे,राजू आग्रे,सुरेश आग्रे,प्रथमेश आग्रे यांसह वाडीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या तर कृषी विभागाचे अधिकारी गवारी त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.