चिपळूण ; गणेशोत्सवामध्ये सोडलेल्या एसटीच्या ज्यादा गाड्यांमधून ४० लाखांचे उत्पन्न

0
49
बातम्या शेअर करा

चिपळूण – दोन वर्षाच्या कोरोना संघर्षानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणपतीला गावी आले. चाकरमान्यांनी प्रवासाकरिता लाल परीला पसंती दिली होती.

त्यामुळे चिपळूण आगारातून सोडण्यात आलेल्या गणपती उत्सवासाठी जादा फेऱ्यांमुळे चिपळूण आगाराला ४० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. याकरिता २४८ एकूण फेऱ्या लालपरीला माराव्या लागल्या. यासाठी ८१ हजार ६४२ किलोमीटर लाल परी धावली.कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नेहमीच चिपळूण आगार सेवेसाठी सज्ज असते. यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणपतीला गावी आले होते. या सर्व चाकरमान्यांची मुंबईला आणि इतर शहरांमध्ये जाण्याचा परतीचा प्रवास सुसज्ज व्हावा याकरिता चिपळूण आगार मार्फत ज्यादा बसेस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुंबई, बोरवली, पुणे, ठाणे, भांडुप, वसई, नालासोपारा व कल्याण या शहरात जाणाऱ्या चाकरमानांना उत्तम सुविधा प्राप्त झाली. यावर्षी चाकरमानाने रेल्वेपेक्षा लालपरीला पसंती दिली होती. याच ज्यादा फेऱ्यांमधून चिपळूण आगाराला ४० लाखांचे भरघोस उत्पन्न प्राप्त झाले. लालपरीने एकूण ८१६४२ किलोमीटर पार करत २४८ फेऱ्या तिने मारल्या. यामध्ये मुंबई ६६, बोरवली ८४, पुणे ४५, ठाणे २२, भांडुप १४, वसई ४, नालासोपारा ५ व कल्याण ९ अशा फेऱ्यांमधून आगाराला ४० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती चिपळूण आगार प्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here