खेड – दापोलीतील आदित्य ठाकरेंची सभा ऐकली. त्यांच्यासोबत सोंगाड्या ही होता, भास्कर जाधव त्याच भाषणही ऐकलं.
कोकणामध्ये शिवसेना मोठी झाली. महाराष्ट्रात कोकणाने शिवसेना मोठी केली. आज आदित्य ठाकरेंना कोकणात येऊन शिवसेना काय आहे, ते सांगाव लागत. मुंबईसह महाराष्ट्रात कोकणवासियांनी शिवसेना मोठी केली. गद्दारी, खोक्यांची भाषा आदित्य ठाकरेंना कोकणात येऊन करावी लागते, याचं आश्यर्य वाटतं. बाप-बेटे दोघे आमदार, खासदार मंत्र्यांना भेटले असते, तर आज वणवण भटक्याची गरज नव्हती” अशी टीका ऱामदास कदम यांनी केली.