गुहागर – शेठ येऊ दे, नाहीतर दादा भाई येऊ देत..! गुहागरचा पुढील आमदार मनसेचाच होणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे गुहागरचे आमदार प्रमोद गांधी होणार असल्याचा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्यापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शृंगारतळी बाजारपेठेतून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. शेकडो मनसे सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्कअध्यक्ष प्रमोद गांधी, तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर, बोरगावचे सरपंच सुनिल हळदणकर, गुरू पाटील, प्रशांत सावर्डेकर, उदय घाग, रमेश गांधी, अभिनव भुरण, डॉ. प्रदीप आठवले, समीर जोशी, राहुल जाधव, तेजस पोफळे आदी उपस्थित होते. यावेळी गुहागर तालुका मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव संतोष नलावडे, ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण म्हणाले की, गुहागर तालुक्यात मनसे पक्ष वाढण्यास काहीच अडचण येथील तालुकाध्यक्ष व तालुका स अध्यक्ष जोमाने मनसे पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील लोकप्रतिनिधी तालुक्यातील विविध प्रश्न, समस्यांवर विधिमंडळात बोलत नाहीत. त्याचाही जनतेने विचार केला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाचे वाटोळे करण्याचे काम फक्त शिवसेनेने केले. पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून पक्ष हितासाठी काम करा. गुहागर आजही मागास राहिला आहे. नागरी सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आज जनतेच्या प्रश्नावर मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.