मुंबई-गोवा महामार्गावर दि. २७ आँगस्टपासून अवजड वाहतूक बंद केली जाणार

0
177
बातम्या शेअर करा

चिपळूण – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी उसळणार आहे.

चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग सज्ज झाला असून महामार्गाची पाहणी करून सात धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याच्या दुरुस्तीच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर दि. २७ तारखेपासून अवजड वाहतूक बंद केली जाणार आहे.मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सात फिरती पथके तैनात केली जाणार आहेत तसेच अपघात घडल्यास तात्काळ मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here