गुहागर – गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील अरमारकर मोहल्ला, येथील राहणारी ३ अल्पवयीन मुली या काल सायंकाळी डॉक्टरकडे जातो असे सांगून रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने या परिसरात एकच खळबळ मारली होती. अखेर याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात मिसिंगंची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गुहागरच्या पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेत त्या तीन मुलींना बारा तासाच्या आत शोधून काढल्याने गुहागर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते.
अंजनवेल येथील मोहल्यात राहणा-या अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी यांनी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही अजंनवेल येथील डॉक्टरांकडे जायचे असल्याचे सांगुन सौ. गजाला यांच्या ३ मुलींना सोबत घेवुन गेल्या मात्र तिनही अल्पवयीन मुली परत न आल्याने मोहल्यात इतरत्र शोध घेतला तसेच डॉक्टरांकडेही चौकशी केली तेव्हा सदर महिला व मुली हॉस्पीटल मध्ये गेल्या नसल्याचे समजले, सौ. गजाला महालदार यांनी रात्री १२.०० वाजेपर्यंत वाट पाहुन आपल्या अल्पवयीन मुली घरी परत आलेल्या नसल्याने व सदर दोन्ही महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क क्रमांक बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. याबाबतची माहिती गुहागर पोलीसांना प्राप्त होताच सदर घटनेत एकुण ७ बालक व २ महिला बेपत्ता असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागिय पोलीस अधिकारी चिपळुण यांचे सुचनेप्रमाणे शोध घेण्यास सूरवात केली. यावेळी गुहागर पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व ८ अमंलदार यांचे ४ पथके तयार केली, प्रत्येक पथकाला दापोली, दाभोळ,चिपळुण, मुबंई अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुषार पाचपुते यांनी पाठवले. घटनेच्या गांभीर्याप्रमाणे क्षणाचा विलंब न करता या प्रकरणाचा सविस्तर तपास केला. यावेळी या महिला या सर्व बालकासहित मुबंईच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याने त्या प्रमाणे वेळ न घालवता एक पथक तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते. इतर पथकाने केलेल्या तपासामध्ये सदरच्या महिला व ७ बालके हे मुंबईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्नं झाले. घटनाक्रम व वेळेची सांगड घालत गुहागर पोलीसांनी सदर दोन्ही महिला व ७ बालके यांना दादर येथुन सुखरुपरित्या ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली पवन कांबळे, हनुमंत नलावडे, राजेश धनावडे, वैभव ओहोळ, वैभव चौगुले , रमझ शेख यांचे पथकाने केले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास तुषार पाचपुते हे करत आहेत.