28 जुलैला जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत

0
142
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – जिल्हा परिषद 62 गट आणि 124 पंचायत समिती गणांसाठी 28 जुलैला आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी थांबली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद गट तर , पंचायत समिती आरक्षण सोडत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होईल . सर्वसाधारण , ओबीसी आणि अनुसूचित जाती असे आरक्षण काढले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समितीच्या बाबतीत संबंधित तहसीलदारांकडून आरक्षणाची सोडत काढण्यात यावी , असे सूचित केले आहे . पंचायत समिती आरक्षण सोडतीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 62 गट तर पंचायत समितीचे 124 गण तयार झाले आहेत . ओबीसी आरक्षणाचा विचार केला तर 17 जि.प. गट तर 34 पंचायत समिती गण राखीव होण्याची शक्यता आहे . आता आरक्षण पडल्यानंतरच इच्छुकांची धावपळ होणार आहे . या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या नंतर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here