गुहागर – भारत हा शेतीप्रधान देश आहे. याच देशांमध्ये शेतकऱ्याला मोठा मान आहे. असे असताना मात्र महाराष्ट्रातील गुहागर तालुक्यातील एका गावामध्ये एका शेतकऱ्याला शेतीपूरक कुकूटपालन व्यवसाय बंद करण्याचा आदेश ज्या वेळेला एखादी ग्रामपंचायत देते त्यावेळेला या ग्रामपंचायतीच्या पुढे सगळे कायदे हातबल झाले का ? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो.
गुहागर तालुक्यातील मुंढर येथील एक महिला आपल्या पारंपारिक शेती व्यवसाय बरोबर घरामध्ये गावठी कोंबड्याची पालन करते मात्र महिलेला याच ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवकांनी अजब लेखी आदेश काढत आपल्या घरातील असणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेश दिलेत त्यांच्या लेखी आदेशामुळे सदरील महिलेला आता आपल्या उपजीविकेसाठी काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. एखाद्या गावात शेतकरी ज्या वेळेला शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करत असतो. तर त्याला इतर कोणाचीही हरकत नसते. मात्र याच गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी काढलेल्या या लेखी आदेशानंतर मात्र गुहागर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.याबाबत गुहागर पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती विचारली असता त्यांनी याबाबात ते म्हणाले की कुकूटपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. त्याला कोणीही बंदी घालू शकत नाही. जर तुम्ही आज कुकूटपालन बंद करा असे म्हणत असाल तर भविष्यात शेतीही बंद करा… असे आदेश काढाल असे त्यानी गमतीत सांगितले.
या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंचांनी काढलेले या लेखी आदेशाची सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. गावातील नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या ग्रामसेवकावर आणि सरपंचावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता सर्वच स्तरमधून केली जात आहे.