गुहागर – सिंगापूर येथील कंपनीचे 22 जूनला कोलंबो येथून निघालेल्या बार्ज कलंडल्याने त्याच्या मुख्य टगशी समुद्रातील संपर्क तुटला होता. तर 9 जुलै पासून रडारवरील त्याची पॉझिशन सुद्धा दिसतं नव्हती. त्याचा शोध सुरु असतानाच त्याचे लोकेशन रत्नागिरी तालुक्यातील जयगड पालशेत येथे खोल समुद्रात किनाऱ्यापासून 13 नॉटिकल माईल्स वर आढळून आल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र आज सकाळी सिंगापूर येथील हे तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. त्यामुळे बार्ज मधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. या बार्जवरील कर्माचारी सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू बाबत समजून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.