चिपळूण – दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू ठेवण्याचे आणि रात्री घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (१४ जुलै )जारी केले आहेत.
हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.सोपदरीकरणासाठी ठीक ठिकाणी खोदकाम झाल्याने चिपळूण जवळील परशुराम घाट धोकादायक बनला आहे तेथे दरड कोसळण्याचा धोका असल्याने घाटातील वाहतूक गेले काही दिवस बंद आहे त्या पार्श्वभूमीवर पेन आणि रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्ग विभाग पोलीस आणि परिवहन विभागाने घाटाची पाहणी केली घाटातील वाहतूक सुरक्षित करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली सुरक्षा विषयक विविध कार्यालयांच्या सूचनेनुसार आजपासून १४ जुलै पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहेसर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सायंकाळी ७ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे खेडकडून चिपळूण कडे एक तास आणि चिपळूण कडून खेडकडे एक तास अशी आळीपाळीने वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे वाहतूक सुरू असताना दोन अवजड वाहनांमध्ये किमान ५० ते १०० मीटर इतके अंतर असावे वाहनांचा वेग ताशी २९ ते ३९ किलोमीटर असावा अशा सूचना देण्यात आले आहेतसुरक्षिततेसाठी घाटात २४ तास गस्त आणि बचाव कार्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत घाटातील वाहतूक कोणत्या वेळी खुली किंवा बंद राहणार आहे याबाबत घाटाच्या सुरुवातीस आणि घाटाच्या शेवटी तशा सूचना ठळकपणे लावण्यात आले आहेत तसेच त्याबाबत पनवेल सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर येथेही व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना करण्यात आली आहेपरशुराम घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईहून येणारी जास्तीत जास्त वाहने पनवेल होऊन मुंबई पुणे महामार्गावरून तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली जिल्हा रत्नागिरी येथून रत्नागिरी कोल्हापूर पुणे या मार्गे बळवण्यात येतील चिपळूण कडून खेडकडे येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी कळंबस्ते -आंबडस – शेल्डी – आवाशी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.खेडकडून चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पीरलोटे – चिरणी आंबडस फाटा कळंबस्ते फाटा हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.