रत्नागिरी ; जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा , मुंबई गोवा महामार्गाला आल नदीच स्वरूप

0
695
बातम्या शेअर करा

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळपास सर्व भागात आगामी २४ तासांत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

रत्नागिरी चिपळूण व जिल्ह्यात अन्य भागात मुसळधार पाऊस पडत आहे चिपळूणच्या डीबीजे कॉलेज परिसरात हायवेवर तळ्याचे स्वरूप आले होते. तर चिपळूण, सावर्डे ,मार्गावर कापसाळ येथे देखील रस्त्यावर पाणी साचले होते त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच वाहनांना मार्ग काढावा लागत होता . आज (४ जुलै) संध्याकाळी चारपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांची पाणी पातळी अचानक वाढवण्याची शक्यता आहे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here