दापोली ; हर्णे समुद्र किनाऱ्यावर पार्किंगच्या वादावरून दोन पर्यटकांवर टोळक्यांकडून कोयत्याने वार

0
81
बातम्या शेअर करा

दापोली – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हर्णे समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावरून पुण्यातील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले.या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. शुभम परदेशी ,सूरज काळे अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील राहणारे आहे.पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र आज ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याचवेळी सुराली गार्डन जवळ एक ईनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला करं, असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला.शुभम परदेशी, सूरज काळे या हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसंच गाडीची काचही फोडण्यात आली. या घटनेनंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.या दोन्ही पर्यटकांवर खुनी हल्ला करणारे सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here