रत्नागिरी – मशिदीत होणाऱ्या अजान बद्दल रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी महत्वाचा निर्णय घेतला असून आता रत्नागिरी शहरात आता दररोज सकाळची अजान भोंग्याचा उपयोग न करता होईल असे त्यांनी पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे.
त्याचवेळी भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ४ मे पासून मशिदीवरील भोंग्याबाबात भूमिका स्पष्ट करण्यासाठी रत्नागिरी शहरातील मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली. यामध्ये सकाळची अजान ही भोंग्यचा आवाज न करता केला जाईल तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल अशी स्पष्ट भूमिका यावेळी मुस्लिम बांधवांनी पोलिसांसमोर मांडली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची कल्पना देऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुस्लिम बांधवांच्या या भूमिकेचे पोलिसांनी स्वागत केले.