चिपळूण -गारांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ६२ लाखांचे नुकसान झाले आहे. वेगवान वार्यांमुळे घरे, गोठे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील शेतकर्यांना बसला असून ९९१ हून अधिक शेतकर्यांचे ४०० हेक्टरवरील बागायतींचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वार्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील काही गावांतील घरांची छपरे उडून गेली. घरांचे सुमारे ५८ लाखांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त तीन शाळा, पोल्ट्री फार्म, शौचालय, मंदिर, दुकान, आरोग्य केंद्र यांनाही या अवकाळीचा तडाखा बसला. जिल्ह्यात सुमारे ६२ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चारशे हेक्टरहून अधिक जमिनीतील फळबागा व शेतीचे नुकसान चिपळूण व संगमेश्वरमध्ये नोंदवण्यात आले आहे.