बातम्या शेअर करा

गुहागर – ‘तीन महिन्यांनी मी गुहागरला येईल’ असेच निवडून आल्यावर सांगणारे खासदार सुनील तटकरे यांचे कुठे गेले आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेने उपस्थित केला आहे. त्यांच्या खासदारकीच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत गुहागर मतदारसंघात किती विकासाची कामे झाली असा सवाल उपस्थित होत असून जनतेचे प्रश्न सोडविण्यात कार्यकर्त्यांनाही अपयश येत असल्याने येथील राष्ट्रवादीला एक प्रकारे मरगळ आल्याची दिसून येत आहे.

खासदार म्हणून निवडून आल्यावर तटकरेंचा गुहागरचा विकासाचे बरेच प्रश्न होते. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही हे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले होते. कोकणच्या पर्यटन विकासावर बोलणाऱ्या खासदार ठाकरेंकडून गुहागरच्या पर्यटन विकासाकडे मात्र दुर्लक्षच झाले आहे. मोडकाआगर पुलाच्या दुरुस्तीचे सुमारे दोन वर्ष घोंगडे भिजतच होते. मात्र तटकरे यांनी या पुलाचे काम लवकर व्हावे म्हणून कोणतेही प्रयत्न केले नव्हते. देवघर हायस्कूल शाळा मैदानातील क्रीडा संकुल असो किंवा गेली आठ वर्षे रखडलेल्या सागरी आगार जेटीचा बांधकामाचा प्रश्न असो तसेच गुहागर विजापूर रस्ता रुंदीकरण आतील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत प्रश्न असो खासदार तटकरे यांनी अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे कधीच गांभीर्याने पाहिले नसल्याने जनतेकडून बोलले जात आहे.
कोरोना कालावधीत गुहागरचा आर्थिक कणा असलेले पर्यटन फारच रसातळाला गेले. येथील उद्योग व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळली. अशा स्थितीत त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असताना खासदार या नात्याने तटकरे यांनी दुर्लक्षच केले. कोरोना नंतर येथील सर्व काही लहान-मोठे ्यवसाय सुरळीत होत असतानाच गुहागर समुद्रकिनाऱ्याच्या टपर्‍यांवर कारवाई झाली. मात्र येथील टपरी व्यवसायिकांना कोणताही दिलासा देण्याचे काम झाले नाही. कोकणातील रत्नागिरी दापोली सारख्या समुद्रकिनारा लाभलेल्या पर्यटन स्थळांचा पर्यटन विकासाचा समावेश झाला. मात्र गुहागर तालुक्यातील एकाही स्थळाचा पर्यटनात समावेश न झाल्याने अनेकांची नाराजी व्यक्त झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी गुहागर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी खासदार तटकरे यांच्याकडे रस्ते दुरुस्तीची लहान-मोठी कामे सुचविली होती व तशी निवेदनेही दिली होती. मात्र बहुतांशी रस्त्यांची कामे मंजूर झाले नसल्याची बाब निदर्शनास आली असून कामे सुचवणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गुहागर मतदारसंघात त्यांचा विकास कामांचा कुठेही मागमूस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी झटत असताना त्यांच्या संसदेतील खासदार असलेले सुनील तटकरे मात्र निधी असूनही गुहागर कडे लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा कल रायगड कडे जास्त आहे असे गुहागरचे भाजपा तालुका अध्यक्ष नीलेश सूर्वे म्हणाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here