बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील नरवण येथील आशुतोष जोशी हा तरुण नरवण ते जगन्नाथ पुरी (ओरिसा) या आपल्या १८,५०किलोमीटरच्या पायी प्रवासाचा रामनवमीच्या शुभारंभ केला.

आशुतोष हा मुळचा गुहागर तालुक्यातील नरवण गावचा रहिवासी आहे. उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेला. आशुतोषने आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चिपळुण तालुक्यात पूर्ण केले. यानंतर मॉडेल ऑफ आर्ट इन्स्टिट्यूट दादर येथे १ वर्ष तर भारती विद्यापीठ स्कुल ऑफ फोटोग्राफी पुणे येथे २ वर्षाचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने इंग्लंड येथे व्हिज्युअल आर्ट्सची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फोटोग्राफी आणि निसर्ग संतुलन याबाबत तो स्कॉटलंड,स्पेन आणि इंग्लंडमध्ये काम करत आहे. आशुतोषला लहानपणापासुनच फोटोग्राफीची आणि प्रबोधनपर वैज्ञानिक लिखाणाची आवड आहे. या सर्व गोष्टी बरोबर पायी प्रवास करणे आणि गिर्यारोहणाची त्याला मोठी आवड आहे. नेपाळमधील १८००० फुट उंची असणाऱ्या अन्नपूर्ण सर्किट हे शिखर त्याने १७ दिवसात पार केले आहे. इंग्लंड,स्कॉटलंड, स्पेन या ठिकाणी काम करत फिरत असताना जगभरात पाण्याची होणारी टंचाई ,पृथ्वीवरचा पाण्याचा कमी होणारा साठा,नापीक होणारी जमीन, प्लॅस्टीकचा वाढता वापर-भविष्यातील त्याचे दुष्परीणाम,वारंवार समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे,वाढती उष्णता यामधुन शेतकऱ्यांमध्ये येणारे नैराश्य आणि या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या याचे प्रमाण कमी करण्यासाठी विज्ञानाची कास धरून देशामध्ये विशेषकरून महाराष्ट्रामध्ये याबाबतची जनजागृती होणे, याबाबतचे प्रबोधन होणे हे भविष्यकाळाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहे. याकरता आपला काही ना काही तरी खारीचा वाटा असावा उद्देशाने आशुतोषने हा पायी प्रवासाचा मार्ग निवडला आहे. मागील ६ ते ७ वर्ष पायी चालण्याची सवय असली तरी या प्रवासाची पुर्वतयारी इंग्लंडवरून भारतात आल्यानंतर गेले सहा महिने आशुतोष करत आहे. त्याचबरोबरीने प्राणायाम,योगा,श्वसनाचे व्यायाम करत असल्याचे त्याने सांगीतले. याकरता त्याला भारतातुन व परदेशातुन त्याचे सहकारी मित्र फंड ही देणार असल्याचे आशुतोषने सांगितले. तर त्याचे काही सहकारी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले मित्रमंडळी या प्रवासात काहीजण काही तास तर काहीजण एक-दोन दिवस त्याच्याबरोबर प्रवासही करणार असल्याचे त्यांने सांगितले. मुळचा नरवण गावाचा सुपुत्र असणारा आशुतोष पाण्याची बचत, योग्य नियोजन,शेतकरी आत्महत्या या जागतिक दर्जाच्या विषयासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी १८ हजार ५० किलोमीटरचा प्रवास करणार ही गोष्ट आपल्या गावासाठी भुषणावह असल्याने नरवण ग्रामपंचायतीच्यावतीने त्याचा प्रवासापुर्वीच सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या तर , रामनवमीच्या दिवशी आशुतोषला प्रवासाच्या शुभारंभी नरवण गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या प्रवासात त्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी,प्रवास निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले यावेळी आशुतोषचे आजोबा निवृत्त तहसीलदार जयंतकाका जोशी, आरडीसीसी बँकेचे संचालक डॉ.अनिल जोशी, नरवण गावचे सरपंच प्रवीण वेल्हाळ, शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी सचिन जाधव, भाजपाचे तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, नरवणचे माजी उपसरपंच समीर देवकर, माजी सैनिक राजेश जाधव, प्रफुल जाधव, संजय आरेकर,सदानंद मयेकर, आपेश जाधव, अमोघ वैद्य, राहुल ओक, ओम जोशी,श्रीकांत जोशी आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.

प्रतिदिनी ३० किलोमीटरचा पायी प्रवास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन गुहागर तालुक्यातील नरवण गावातुन सुरू झालेला हा प्रवास चिपळुण, कोयना, पाटण, उंब्रज, पंढरपुर, सोलापूर, लातुर, परभणी, अकोला, अमरावती, नागपुर त्यानंतर छत्तीसगड राज्यातील रायपुर मार्गे ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे पुर्ण होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here