चिपळूण – कोकणात प्रचंड पाऊस पडूनही एप्रिल , मे महिन्यात गावात पाणी टंचाई निर्माण होते. वडेरू हे चिपळूण तालुक्यातील गाव, 26 जानेवारीच्या दिवशी एक बैठक घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून गावच्या नदीमध्ये वनराई बंधारा बांधण्याचे ठरले. जेणे करून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदी काठच्या विहिरीची पाण्याची पातळी कायम राहील. नियोजित प्रमाणे गावातील ग्रामस्थ आणि TWJ फौंडेशन – द सोशल रिफॉम्स असे एकत्र येऊन ₹ वनराई बंधारा बांधण्यात आला.
या श्रमदानासाठी वडेरू ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक , TWJ संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी, जलप्रेमी शहानवाज शहा तसेच वारेली गावचे स्थानमित्र शंकर कदम उपस्थित होते.
40 फूट लांबी, 4 फूट उंचीच्या या वनराई बंधारामुळे सुमारे 70 हजार लीटर पाणी साठवले जाईल ज्यामुळे नदीकाठच्या 02 विहिरींच्या पाण्याची पातळी एप्रिल मे महिन्यातही गावाला पाणी पुरेल इतकी राहील.TWJ फौंडेशन – द सोशल रिफॉम्स संस्थेच्या माध्यमातून या बंधाऱ्यासाठी आवश्यक प्लास्टिक कागद आणि सिमेंट पोतड्या देऊन श्रमदान देखील करण्यात आले. वडेरू गावचे ग्रामसेवक यांनी सर्वांचे आभार मानले.
कोकणातील पाणी टंचाईसाठी वनराई बंधारा ठरतोय तारक…
कोकणात प्रचंड पाऊस पडूनही एप्रिल , मे महिन्यात गावात पाणी टंचाई निर्माण होते. वडेरू हे चिपळूण तालुक्यातील गाव, 26 जानेवारीच्या दिवशी एक बैठक घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून गावच्या नदीमध्ये वनराई बंधारा बांधण्याचे ठरले. जेणे करून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदी काठच्या विहिरीची पाण्याची पातळी कायम राहील. नियोजित प्रमाणे गावातील ग्रामस्थ आणि TWJ फौंडेशन – द सोशल रिफॉम्स असे एकत्र येऊन वनराई बंधारा बांधण्यात आला.या श्रमदानासाठी वडेरू ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक , TWJ संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी, जलप्रेमी शहानवाज शहा तसेच वारेली गावचे स्थानमित्र शंकर कदम उपस्थित होते.
40 फूट लांबी, 4 फूट उंचीच्या या वनराई बंधारामुळे सुमारे 70 हजार लीटर पाणी साठवले जाईल ज्यामुळे नदीकाठच्या 02 विहिरींच्या पाण्याची पातळी एप्रिल मे महिन्यातही गावाला पाणी पुरेल इतकी राहील.TWJ फौंडेशन – द सोशल रिफॉम्स संस्थेच्या माध्यमातून या बंधाऱ्यासाठी आवश्यक प्लास्टिक कागद आणि सिमेंट पोतड्या देऊन श्रमदान देखील करण्यात आले. वडेरू गावचे ग्रामसेवक यांनी सर्वांचे आभार मानले.