गुहागर – (विशेष प्रतिनिधी )- नुकतीच रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रकल्पच्या सर्व अधिकारी वर्गाने कंपनची दयनीय अवस्था मीडिया मार्फत सर्वासमोर ठेवली. देशातील हा सर्वात मोठा वीज प्रकल्प म्हणणारे या अधिकारी वर्गाने पुढील काळात वीज खरेदार मिळाला नाहीतर कंपनी दिवाळखोरीत जाईल अशी भीती व्यक्त केली होती.याचा परिणाम म्हणून येत्या दोन महिन्यात स्थानिक कामगारांची काटछाट करण्याचे व खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी नवा बेडगी फॉर्म्युला तयार केला. कंपनीच्या या अवस्थेत मध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांना नुकसानीची झाळा सोसाव्यात असे मत कंपनीच्या एमडी ने व्यक्त केले.
या कंपनीकडे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत यांना कर देण्यासाठी निधी नाही. तर कर द्यावा लागणार नाही या साठीचे शासनाचे लेबल लावूंन पळवाट काढण्याचे काम कंपनी करत आहे. मात्र दुसरीकडे याच कंपनीतील भागीदार असलेल्या इतर कंपन्यांचे अधिकारी व त्यांच्या कुटुंबाचे मनोरंजन व्हावे
यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे.या मध्ये नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धा ज्यात पंचक्रोशीतील कोणीही कामगार किंवा ग्रामस्थ नाही.तर कंपनीने भरवलेल्या मॅरेथॉन मध्ये कंपनीतील अधिकरी व त्यांच्या कुटुंबातील सहभाग फक्त होता.असे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत.
आणि आता मात्र निमंत्रित संघाच्या कबडी स्पर्धा ….
या तिन्ही उपक्रमवर कंपनीची लाखो रुपयांची उधळण सुरू आहे.या कंपनीच्या मिळणाऱ्या ज्या करा वर अंजनवेल, वेलदुर रानवी या गावाचा विकास होत होता.
तोच कर देण्यास कंपनी टाळ- टाळा करत आहे. परिणामी प्रकपग्रस्त गावातील विकासच ठप्प झाला या विकास कामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरी ही गेल्या आहेत. अशी अवस्था या तिन्ही गावांची असताना या ग्रामपंचायतींना मदत करण्यासाठी कंपनीकडे निधी नाही. मात्र अधिकारीवर्ग यांची हौस-मौज करण्यासाठी क्रीडा उपकर्म अंतर्गत उधळण सुरू आहे. यावरून खरोखरी कंपनी दिवाळखोरीत जात आहे. की दिवाळखोरीत जात असल्याचे नवे सोंग सर्वांसमोर ठेवत आहे. त्यामुळे या अशा कंपनीच्या अजब कारभाराने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वीची कंपनी परवडली मात्र दिल्ली मेड या अधिकाऱ्यांची आजची आरजिपीएएल नको रे बाबा असे येथील ग्रामस्थ म्हणत आहेत.
– या कंपनीच्या प्रत्येक उपक्रमाला प्रशासन आवर्जून हजेरी लावत असते.मात्र स्थानिकानी भरलेल्या विविध कार्यक्रमांना कोरोनाचे नियम लावून परवानगी नाकारून या कंपनीतील या कार्यक्रमांना मात्र एक प्रकारे अभय देण्याचे काम प्रशासन करत आहे. कंपनीकडून या प्रशासन अधिकारी यांना मिळणाऱ्या सेवेमुळे प्रशासनाची मेहेरनजर कंपनीवर दिसून येते आहे.