जयगड ; मच्छीमारबोटीवरील खलाशांच्या मृत्यू, सखोल चौकशीची मागणी- विनय नातू

0
516
बातम्या शेअर करा

गुहागर – . २६ ऑक्टोबर २०२१ पासून जयगड बंदरामधील एक मच्छिमार नौका नापता होती, सदरमच्छीमार नौकेवर गुहागर तालुक्यातील सहा ते आठ खलाशी कार्यरत होते. या मच्छीमार नौकेला योग्यठिकाणी मासेमारी करत असताना ठरवून दिलेल्या चॅनेलच्या बाहेर जयगड बंदरामध्ये येणारी एक मोठी बोट
धडकली. मोठ्या बोटीने त्यांचा चॅनेल सोडून त्या बाहेर येऊन मच्छिमार बोटीला धडक दिल्यामुळे मच्छिमार
बोट बुडाली व या बोटीवरील खलाशांचा मृत्यू झाला आहे व सहा ते सात खलाशी बेपत्ता आहेत. याबाबत
सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.बंदर विभाग व कोस्ट गार्ड विभागानेही या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

जयगड बंदरांमध्ये २० ऑक्टोबर पासून कोण कोणत्या मोठ्या बोटी आल्या व गेल्या याची चौकशी करणेआवश्यक आहेअशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी केले आहे.या चौकशीमध्ये ज्याप्रमाणे बोटीचा विमा उतरवला जातो तसाच खलाशांचा विमा बोटमालकाकडून उतरवला जातो का, खलाशांचा विमा उतरवण्या करीता मत्स्य व्यवसाय विभाग लक्ष देते का,याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे. जयगड खाडीमध्ये गेल्या चार पाच वर्षात दरवर्षी तीन ते चार
खलाशांचे अपघाती मृत्यू होत असून तात्पुरती मदत देऊन सर्व प्रकरणे बंद केली जात आहेत. काहीपरराज्यातील खलाशी येथे काम करतात तसेच अत्यंत गरीबी मध्ये असणारे अनेक खलाशी प्राण गमावतातपण याबाबत त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही.हा अपघात प्रत्यक्ष पहाणाऱ्या काही बोटी आहेत या बोटींनी त्यांचे मृतदेह सुद्धा पाहिले होते. परंतु से
मृतदेह किनाऱ्यावर आणण्याकरता कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अप्रत्यक्षरीत्या अशा बोटी सुद्धा या
गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत असेच म्हणावे लागेल. गुहागर तालुक्यातील खलाशाच्या झालेल्या मृत्यू बाबत
संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती
कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातू यांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here