पांचगणी येथील नवदुर्गा स्वाती बिरामणे

0
82
बातम्या शेअर करा

सातारा – ( प्रमोद रांजणे )- स्त्री म्हणजे विधात्याच्या सृजनाचं मूर्तीमंत प्रतिक. या प्रतिकात सामावलेल्या शक्तीचा अंदाज घेणे कधी कधी त्या विधात्याला देखील अवघड होऊन जातं. काय आहे स्त्रीची शक्ती? ……कणखर असणं? तिची अफाट कार्यक्षमता? एकाच वेळी अनेक गोष्टी लीलया करू शकण्याची ताकत? का तिचं हळुवार असणं?………स्त्री असणं ……
एका स्त्रीमध्ये या सगळ्या गुणांची ताकद जेव्हा पाहायला मिळते तेव्हा आपण म्हणतो ‘स्त्री शक्ती तुला सलाम’……


पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावर अशीच ऐक ‘ सावित्री ‘ विद्यानिकेतन हायस्कूलच्या माध्यमातून युगप्रवर्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यांचे नाव आहे सौ. स्वाती महेश बिरामणे… महाबळेश्वर तालुक्यातील पांचगणी शहर व ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा विडा त्यांनी उचला आहे. कायम त्यांना पाठीराखा म्हणून समजले जाते कारण ‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ‘ या स्वामींच्या मार्गावर चालत असतात. मुलांचे शिक्षण व त्यांचे आरोग्य विषय महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार यां विषयी त्या कायदेविषयक ज्ञान देतात.शाळेच्या माध्यमातून अनेक गरीब मुलांना आपल्या शाळेतून मोफत शिक्षण देण्याचा त्यांनी संकल्प ठेवला आहे. यातून काही मुले शिक्षणही घेत आहेत
कधीही प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम, काम आणि फक्त कामच करायचं हा विचार त्या नेहमी करतात. महाबळेश्वर इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी म्हणून त्या कार्यरत आहेत. आपल्या पदांच्या माध्यमातून आपल्या सभोवतालचा समाज संघटित व्हावा आणि त्यांच्या रोजच्या गरजा भागवाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या माध्यमातून वृद्धाश्रमांना त्यांनी अनेकदा मदत केली आहे. तर सध्या पूरग्रस्ताना कपडे वाटप केले आहे व काही धान्य वाटप केले आहे. शाळेतील सर्व मुले ही आपल्या एकाच छताखाली असल्याने आपले कुटुंब समजूनच स्वातीताई आपली सेवा बजावताना दिसतात.
कोरोना काळात बनल्या आधार……कोरीनाने अख्ख जग संकटात सापडले असताना स्वाती ताई शांत बसल्या नाहीत त्यांना या कोरोना काळात औषधे वाटली. आणि आजही त्या देत आहेत. डॉक्टर विद्या बिरामणे यांचा मार्गदर्शन आणि माहिती नुसार तसेच विद्या निकेतनचे संस्थापक आनंदराव बिरामणे यांचा मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. बोलण्यातला स्पष्टपणा व कार्य करून दाखवण्यातला कर्तृत्वपणा असे खंबीर गुण म्हणजे स्वाती ताई म्हणाव्या लागतील . विचारांची प्रगल्भता व मनाचा मोठेपणा, वक्तशीर आणि काटेकोर असे वर्चस्व या गोष्टींमुळे त्यांचे स्थान उंचावते. त्यांनी मांडलेल्या मुद्देसूद विचारांनी समोरच्या व्यक्तीवर पडलेली छाप या गुणांचा अभिमान वाटतो. सकारात्मक विचार अन् स्वत: वर असलेल्या विश्वासाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि एक पाठोपाठ एक स्वप्न साकार केली आहेत. अशा आधुनिक युगातील नवदुर्गेच्या कार्याला सलाम.

स्वाती ताई सांगतात स्वतःची ओळख घडवा…. महिलांना आता स्वतःच खंबीरपणे लढा उभारला पाहिजे. महिला नेहमी दुसऱ्याचा विचार करतात. तसा स्वतःची झाला पाहिजे व महिलांमध्ये धाडस असले पाहिजे .साधी गृहिणी सुद्धा ध्येय ठवल्यास मोठे कर्तृत्व करू शकते ही संकल्पना स्वाती ताई यांनी समाजास दाखवून दिले. सकारात्मक विचार अन् स्वत: वर असलेल्या विश्वासाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि एक पाठोपाठ एक स्वप्न साकार केली आहेत. अशा आधुनिक युगातील नवदुर्गेच्या कार्याला सलाम.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here