चिपळूण बचाव समितीची सात हजार अर्ज घेऊन नगरपालिकेवर धडक

0
137
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण बचाव समितीचे अनेक सदस्य बुधवार १३ ऑक्टोबर रोजी हरकतीचे सात हजार अर्ज घेऊन नगरपालिकेवर धडकले.जलसंपदा विभागाकडून चिपळूण शहरात निषेधक पूर रेषा व नियंत्रक पूर रेषा आखण्यात आलेल्या आहेत या संदर्भात शासन मार्फत हरकती सूचना वृत्तपत्रातून जाहीर करून मागितलेल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण चिपळूण शहरातून नगरपालिकेत जवळपास ९ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी बचाव समितीने सात हजार अर्ज नगरपालिकेत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे आणून दिले.

यावेळी चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने,बापू काणे,सतीश कदम, शिरीष काटकर,किशोर रेडीज,राजेश वाजे, ,उदय ओतारी, समीर जानवलकर,शहानवाज शाह आदीसह अनेक सदस्य उपस्थित होते. त्यांचेसोबत माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेवक राम रेडीज, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा,अश्रफ मेमन व अनेक नागरिक, व्यापारी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात या पूरनियंत्रक रेषेच्या गोंधळामुळे राज्यात कोट्यावधी नागरिक व त्यांची मालमत्ता बाधित होणार आहे. त्यामुळे हा निर्णय विधी मंडळामध्ये कायदा होऊन त्यावर सूचना हरकती मागविणे गरजेचे होते .या बाबतचा निर्णय हा शासन निर्णय व परिपत्रक म्हणून जाहीर होणे हे अमान्य आहे . अखंड भारत देशात महापूर येतो परंतु फक्त महाराष्ट्र राज्यात हे परिपत्रक लागू करणे हे अयोग्य आहे . चिपळूण हे पुरातन शहर असून त्याला २००० वर्षापूर्वीची परंपरा आहे तसेच चिपळूण नगर पालिका हि भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी १६ डिसेंबर १८७६ रोजी अस्तित्वात आलेली आहे , पुरातन शहर या परिपत्रकानुसार समान निर्णय लागू करणे हे अयोग्य आहे . या शहराचा पूर्व इतिहास पाहता कोयना धरणातून पाणी वळवून पोफळी व कोळकेवाडी विद्युत निर्मिती प्रकल्प होणे पूर्वी कधीही महापूर आल्याचा दाखला मिळत नाही .म्हणजेच या शहरातून फक्त वाशिष्ठी पाणलोट क्षेत्राचेच नाही तर अखंड राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे पाणी सोडले जाते.त्यामुळे पुराचा मोठा परिणाम होतो . कोयना धरणातून स्तर १ ते ४ या विद्युत निर्मितीचे पाणी कोळकेवाडी धरणात येते. अति पर्जन्य वृष्टी होणेच्या वेधशाळेच्या अंदाजाचे १२ तासापूर्वी ओहोटीच्या काळात जलसाठा हा निदान ४० सेंटिमीटर ने विद्युत निर्मिती अथवा वक्रधारी दरवाजे उघडून हळूहळू कमी करण्यात येण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे . त्यामुळे अतिपर्जन्यवृष्टी व उधाणाच्या भरतीच्या ६ तासाच्या काळात कोळकेवाडी धरणातून स्तर ३ दद्वारे विद्युत निर्मिती बंद करण्यात यावी . कोयना धरण , कोळकेवाडी धरण बांधताना अब्जावधी घनमीटर दगड गोटे व मकिंग याची कोणतीही योग्य विल्लेवाट न लावता शासनाने अत्यंत निष्काळजी पणे हे वाशिष्ठी व तिच्या उपनदीच्या किनारी ठेवलेले आहेत व हे वाहून नदीपात्रात येऊन नदी होरली आहे .यामुळे नदिवहन क्षमता नष्ट झाल्याने महापुरास हे फार मोठे कारण आहे . वाशिष्ठी खोऱ्यात जी बहुतांशी धरणे बांधलेली आहेत त्या पाण्याचा वापर हा फक्त पिण्याकरिता होतो व जल सिंचन करणे करता कमी होतो. त्यामुळे जून अखेरी पर्यंत हि धरणे ७० % पेक्षा जास्त भरलेली असतात हि धरणे जून अखेरीस ७० % रिकामी ठेवण्याचे शासन स्तरावर नियोजन करण्यात यावे . वरील कोणत्याही मुद्द्यांचा विचार अभ्यास व उपाय योजना न होता चिपळूण शहरात निषेधक पूर रेषा व नियंत्रक पूर रेषा बेकायदेशीर आखण्यात आलेल्या आहेत .याबाबत शासनाने वरील मागण्यांची पुर्तता करून योग्य दखल घेण्याची मागणी करण्यात करण्यात आली आहे. अन्यथा चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून संपूर्ण चिपळूणच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here