चिपळूण (प्रतिनिधी)-पूरग्रस्तांसाठी अध्यायावत यांत्रिक स्पीड बोट अशी ही पहिलीच बोट खेर्डीसाठी उपलब्ध झाल्याने साहजिकच हा चर्चेचा विषय बनला आहे. गेले वर्षानुवर्षे येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही ते सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्या माध्यमातून शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
चिपळूण खेर्डी आणि पूर हे नवीन नाही प्रत्येक वर्षी खेर्डी वासियांना पुराचा सामना करावा लागतो परंतु 2005 चा महापूर आणि नंतर सलग दोन-तीन वर्षे आलेल्या पुराने खेर्डीवासियांची अक्षरशःत्रिधातीपट उडवली. अशावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार पूरग्रस्तांसाठी धावून गेले जीवाची पर्वा न करता आणि हातात काहीच साहित्य नसताना त्यांनी चक्क रिक्षा चा टब काढला उलटा केला आणि त्यातून बचावकार्य सुरू केले पुरात अडकलेल्यांना त्या मध्ये बसवुन त्यांनी सुरक्षित स्थळी सोडले व प्रत्येक पुरात प्रकाश पवार यांचा रिक्षा टब पूरग्रस्तांचा आधार ठरला 22 जुलै रोजी आलेल्या महापुरात देखील अशाच पद्धतीने अनेकांना वाचवले.
काक संस्थेचे किशोर काकडे यांनी खेर्डी साठी अद्ययावत असे यांत्रिक स्पीड बोट पाठवून दिली असून ही बोट चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज सोमवारी आमदार शेखर निकम सर व चिपळूण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार साहेब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खर्डीचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य नितीन उर्फ आबु ठसाळे, पंचायत समिती सदस्या दिशा ताई दाभोळकर, रा स प जिल्हाध्यक्ष अशोक पवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य विनोद भुरण, विनय उर्फ बाळा दाते, अभिजीत खताते, संदेश पंडित, रियाज खेरटकर, प्रसाद सागवेकर, राकेश दाभोळकर, दादा खातु, दत्ताराम पवार तसेच खेर्डीतील नागरिकांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुंबई येथून काक इकॉनॉमिक्स चे सदस्य श्री विजय गोलमडे हे देखील येथे आवर्जून उपस्थित होते.
याबाबत प्रकाश पवार म्हणाले गेले कित्येक वर्षे खेर्डीत आम्ही बचाव कार्य करतो आहे. पूर आला तर सर्व धाव घेतात पाहणी करतात पुन्हा सर्व विसरून जातात पण आमचे कार्य कधीच थांबले नाही. त्याची दखल काक संस्थेचे संचालक श्री किशोर काकडे यांनी घेतली आणि अद्ययावत स्पीडबोट दिली आहे. त्याचा उपयोग करण्यासाठी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.