चिपळूण:- वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना या चार अक्षराची किल्ली शिवसैनिकांकडे दिली आहे.इतका प्रचंड विश्वास शिवसेनाप्रमुखांनी आपल्या शिवसैनिकावर दाखवला आहे.तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी ही शिवसंपर्क अभियानाची संधी म्हणून तुमच्याकडे आलो आहे.या संधीचे सोने करा.असे आवाहन तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी केले.
दहिवली बुद्रुक पंचायत समिती गटातील शिवसंपर्क अभियानाची बैठक ढोक्रवली येथील सानेवर आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपतालुकाप्रमुख शरद शिगवण,युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, विभागप्रमुख रुपेश घाग,रविंद्र सुर्वे,रमेश रेपाल,युवासेना उपतालुका अधिकारी नितिन जाबरे, विभाग अधिकारी शरद भुवड,शाखाप्रमुख शशिकांत राणीम,मयूर घाग,राजेंद्र घाग,सचिन नवरंग, प्रविण गावकर, मनोहर गावकर,मनोहर महाडिक,सुहास पांचाळ,ह. भ. प. सदानंद घाग महाराज गावकर गुरुजी, सरपंच लक्ष्मण मांडवकर,प्रदिप घडशी,ज्ञानदेव घाग, कीर्ती घाग,तसेच परिसरातील सर्व ग्रा.प चे सरपंच उपसरपंच,सदस्य,उपविभागप्रमुख,शाखा प्रमुख,महिला संघटक आणि शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी शिवसंपर्क अभियानचा पक्षीय कार्यक्रम सर्वांच्या समोर ठेवून त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे नमूद केले.शिवसेनेत नवा-जुना हा वाद अजिबात असता कामा नये.असे स्पष्ट करतानाच संघटनात्मक तसेच विकास कामाबाबत देखील त्यांनी माहिती दिली.शासनाच्या अनेक योजना समोर ठेवून लागेल त्या ठिकाणी मदत करण्यास मी कठिबद्द असल्याचे आश्वासन दिले.आमदार.भास्कर जाधव सारखे तगडे नेतृत्व आपल्याकडे असताना विकास कामांची अजिबात चिंता करू नका असे ठामपणे त्यांनी नमूद केले.पक्षप्रमुखांचे आदेश तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मी आलो आहे.तुमच्यावर प्रचंड विश्वास पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आहेच.तो विश्वास तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्थ ठरवा.सर्वांनी एकत्र बसा,पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकत्र बसून करा.युवासेनेची मजबूत फळी उभी करा.जे ज्यांना संघटनेच्या कामासाठी वेळ देता येत नसेल त्यांनी स्वच्छेने थांबा,नवीन तरुणांना पुढे आणून संधी द्या.पक्षाच्या धोरणानुसार नियुक्त्या पूर्ण करून माहिती माझ्याकडे द्या.असे आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले.प्रास्ताविक उपतालुकाप्रमुख शरद शिगवण यांनी केले तर सूत्रसंचालन रुपेश घाग यांनी केले.