गुहागर – गुहागर तालुक्यात 24 तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र शेतकरी आनंदित आहे. मात्र त्याच वेळी अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सुद्धा वाहतूक ठप्प झाल्याचे पुढे आले आहे. गुहागर- रत्नागिरी या मार्गावरील आबलोली पासून पाच किलोमीटर अंतरावरील एका नदीला पूर आल्याने गेल्या दोन तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या तर याच पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी आनंदित होऊन लावणीच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत.